शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of Education Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षणाचे महत्व मराठी निबंध /  Importance of Education Essay in Marathi हा निबंध पाहणार आहोत.  शिक्षणाचे महत्व मराठी निबंध हा निबंध आम्ही ८०० शत दिला आहे. मला अशा आहे मी शिक्षणाचे महत्व या विषयावर लिहलेला मराठी निबंध तुम्हाला आवडेल.
Importance of Education Essay in Marathi

आज आपण शिक्षणाचे महत्व पाहणार आहोत शिक्षण म्हणजे एक प्रकारचे शस्ञ आहे. जर हे शस्ञ तमच्याकडे आले तर तुम्ही त्याचा वापर करून संपूर्ण जग जिंकु शकता आणि जर तुमच्याकडे शिक्षण नसेल तर देशाचे अख्खे सैन्य तुमच्या बाजुने दिले तरी तुम्ही जिंकाल याची शक्यता कमीच आहे.

तर सगळ्यात आधी आपण पाहुया जर शिक्षण नसेल तर त्याचे काय काय नुकसान आहेत आणि शिक्षण नसलेल्या माणसाची आवस्था म्हणजे हात असुन सुद्धा हात नसलेल्या माणसासारखी आसते.

आपल्या देशात देश स्वातंञ्य झाल्यापासुन गरिबी, फसवणुक, लोकसंख्यावाढ, भ्रष्टाचार,चोऱ्या होणे, गुंडगिरी या गोष्टी अजुन पण चालु आहेत. देशाला स्वातंञ्य मिळुण ७५ वर्ष पुर्ण झाली तरी पण आजही आपला देश या समस्यापासुन सुटू शकला नाही कारण याला मुख्य कारण आहे आपल्या देशात असलेली निरक्षरता ज्याला इंग्लिश मध्ये literacy असे म्हणतात.

कारण बघा ना असे जगात खूप देश आहेत जे आपल्या मागुन स्वतंत्र झाले आणि आज त्यांच्या देशात आपल्यापेक्षा जास्त प्रगती झाली आहे. कारण त्यांनी आगोदर जास्तीत जास्त लोंकाना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले आहे अशा देशात साक्षरतेचे प्रमाण जवळ जवळ ९९% इतके आहे. त्यामुळे हे देश वेगाने प्रगती करू शकले आणि शिक्षणामुळे तिथल्या लोंकानी सरकारला ही प्रगती करण्यात साथ दिली.

आपल्याकडे असणार्या अनेक समस्या या देशात नाहीतच आणि जरी असल्या तरी त्या अत्यल्प आहेत. आज आपल्या देशात निरक्षरतेमुळे निरक्षर लोंकाना लिहता वाचता येत नाही. तसेच लिहता वाचता येत नसल्यामुळे जगामध्ये असलेली महत्वाची माहिती त्यांना मिळत नाही आणि कधी कधी सरकारने अशा लोकांसाठी सुरु केलेल्या योजनासंबंधी देखील त्यान्ना माहिती मिळत नाही.

तसेच या लोंकाचा शाररिक, मानसिक, तसेच आर्थिकदृष्या विकास होत नाही कारण जर तुम्हाला या जगात काय चाललय हेच माहिती नसेल तर जे आहे तेच अंतिम सत्य म्हणुन स्विकारता आणि शिक्षण नसलेल्या माणसाची आवस्था ही त्या तळ्यातल्या बेडकासारखी होते त्याला ते तळे म्हणजेच जग वाटते.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध

तसेच निरक्षर किंवा आडाणी माणसाला व्यसनाची सवय लागते. कधी कधी तर तो त्या व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन सुद्धा संपवतो म्हणुन आपल्या देशातील लोकसंख्या, भ्रष्टाचार, व्यासनाधीनता, गरिबी, अशा समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही.

तसेच जर एखाद्या घरात जर शिकलेला माणुस नसेल तर त्या घराला अनेक प्रकारच्या समस्याला तोंड द्यावे लागते आणि त्याच ऐवजी एखाद्या निरक्षर घरातील एक जरी माणुस शिकला तरी तो एक माणुस संपुर्ण घराचे कल्याण करतो तसेच येणाऱ्या पिढ्यांचे सुद्धा तो कल्याण करतो.

याचे उदाहरण सांगायचे झाले तर जिल्हाधिकारी असलेले रमेश घोलप सर. रमेश घोलप यांची आई बांगड्या विकण्याचा, पण त्यांना माहित होते शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणुन त्यांनी आपल्या मुलांना म्हणजेच रमेश घोलप यांना उच्च शिक्षण दिले आणि आज रमेश घोलप हे जिल्हाधिकारी झाले आहेत त्यांच्या आईला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्या सगळ्या समस्या रमेश घोलप यांनी संपवुन टाकल्या तसेच त्यांनी स्वताः बरोबरच संपुर्ण घराचे आणि त्यांच्या पुढील काही पिढ्यांचे सुद्धा कल्याण केले हे सगळे शक्य झाले ते शिक्षणामुळेच.

government officer

Education(शिक्षण) घेतल्यामुळे काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे रमेश घोलप सर आहेत त्यामुळे तुम्हाला भविष्यात काही होयचे असेल पण त्यासाठी शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे शिक्षण हे जगाच्या ग्रंथालयाची चावी आहे या चावीने तुम्ही जगाच्या ग्रंथालयाची सगळ्या प्रकारचे ज्ञान घेऊ शकता आणि तुमचे जीवन अतिशय सुखकर बनवू शकता.

तसेच जर तुम्ही शिक्षण घेतले तर तुमच्यासाठी जगातील अनेक मार्ग उघडतील आणि जर तुम्ही शिक्षण नाही घेतले तर तुम्हला अत्यंत कमी मार्ग मिळतील किंवा एक दोन च मार्ग तुमच्या समोर असतील त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करता येणार नाही आवडीचे काम करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.

ग्रामीण भागात खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांना शिक्षण न घेता आल्यामुळे लहान वयातच काम करावे लागते आणि ते बालमजूर बनतात.

कायद्याने बालमजुरी हा गुन्हा आहे असे जर तुमच्या आजूबाजूला होत असेल तर ते थांबवा किंवा प्रशासनाला कळवा ग्रामीण भागात अनेक मुलांना शिक्षणाची आवड असते पण त्यांचे पालक त्यांना शिकू देत नाहीत किंवा म्हणतात कि शिक्षणासाठी खर्च करण्याची आपली ऐपत नाही तर आशा विध्यार्थ्यानी घाबयायचे काही कारण नाही कारण मोफत शिक्षण देण्याचीही जबादारी हि आता सरकारची आहे.

सरकारने अल्प दारात सर्वाना शिक्षण घेता येईल अशा योजना आणल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आजच्या या २१व्या शतकात शिक्षण घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जर तुम्हाला खरंच शाळेत जायचे असेल तर तुमच्याजवळ वाडी, वस्ती जिथे शाळा असेल तिथे जा तेथील शिक्षकांना भेटा आणि त्यांना सांगा कि मला शाळेत जायचे आहे, जरी घरचे नको बोलत असतील तरी सुद्धा तुम्ही शाळेत जा.

तुमचे शिक्षक स्वतः येऊन तुमचा घरच्यांना शिक्षणाचे महत्व सांगतील तसेच तुम्ही शाळेत गेल्यावर तुमच्या जेवणाची, पुस्तकांची सोय ही शाळाच करेल. हे सर्व तुमचा घरच्याना पटवून देतील. मग मात्र नक्कीच तुमच्या घरचे तुम्हाला शाळेत पाठवतील तर तुम्हला तुमच्या मनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तसेच आयुष्यात मोठे होण्यासाठी व समाजात आपल्याला आदर मिळावा तसेच तुमची स्वप्ने काही पण असो ते पूर्ण होतील ती पुर्ण करण्याचा मार्ग शाळेतून जातो तेव्हा आता तुम्हाला सर्वाना शिक्षणाचे महत्व समजले असेल.

10 lines on the importance of education in Marathi

  1. आधुनिक काळातील प्रत्येकासाठी चांगले जीवन जगण्याची मूलभूत गरज म्हणजे शिक्षण आहे.
  2. चांगल्या शिक्षणाशिवाय, एखादी व्यक्ती चांगली कमाई करण्याची संधी गमावू शकतो.
  3. शिक्षण इतरांकडून आपले शोषण आणि फसवणूक करण्यापासून आपले संरक्षण देखील करतो.
  4. सुशिक्षित लोकांची मोठी लोकसंख्या ही देशासाठी एक मौल्यवान मालमत्ता आहे.
  5. शिक्षण आपल्याला तांत्रिक प्रणाली आणि सेवा वापरण्यास सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
  6. सुशिक्षित लोकच वेगवेगळ्या नोकर्‍या घेऊ शकतात आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकतात.
  7. शिक्षणामुळे समाजाला पुढे नेण्यास मदत होते आणि विचार आणि आचरणाचे जुने आणि अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकते.
  8. शिक्षण एखाद्या व्यक्तीला, त्यांच्या कुटुंबासह आणि समुदायासह उन्नत करायला मदत करते.
  9. अर्थव्यवस्थेत गरीब विभागातील लोकांना विकसित आणि समृद्ध होण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.
  10. आपण आपल्या शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे आणि हे सुनिश्चित केले पाहिजे की समाजातील प्रत्येक विभागातील मुलांना शिक्षणाची समान संधी मिळेल.

आता शेवटी महापुरुषांची सांगितले एक वाक्य सांगतो आणि या निबंधाचा शेवट करतो ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरतोच “ म्हणजे काय तर शिक्षण घेतल्यावर माणूस कोणत्याच गोष्टींना भीत नाही अन्यायाविरुद्ध लढतो म्हणून आपण वाघिणीचे दूध प्यायला पाहिजे.

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो कसा वाटला “शिक्षणाचे महत्व मराठी निबंध” कंमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला या लेखात काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला काही नवीन माहिती या लेखात जोडायची असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.  आणि हा लेख शेअर करायला विसरू नका.

 

हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment